तू नाही आलीस ,तुझी आठवण येऊन गेली ..
तुला भेटण्याची आता इच्छाच नाही राहिली ..
तरी पण भास झाला मनाला ,वाटले कि तू आली ..
पण दार उघडून पाहतो तर काय ,
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली ......
खूप आस होती ग तुला एकदा तरी भेटण्याची
माझ्या मनातल्या भावना तुला सांगण्याची
निदान मी मेल्यावर तरी मला गळ्याशी लाऊन रड
खरच खूप इच्छा होती तुला गळ्याशी कवटाळण्याची .
मथुरेच्या गवळणीच्या घोळक्यात ...
मला साजेशी एक गवळण शोधतोय ...
उधळेन माझ्या सावल्या रंगावर गुलाल ..
अशी सुंदर एक राधा शोधतोय ...
* धुळवड च्या हार्दिक शुभेच्छा *
जीवनाकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा असूनही, जर का ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही. तर आपले मन दुखावले जाते, आणि जर,अपेक्षा न ठेवता काही मिळाले तर, त्यातून मिळणारा आनंद हा अफलातून असतो